Vachanache Mahatva Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण वाचते होऊया [ वाचनाचे महत्व ]या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाचन का गरजेचे आहे ? शैक्षणिक जीवणानंतरही वाचनाचे काय फायदे ? या सर्व प्रश्नांची माहिती या निबंधामधून पाहणार आहोत.
वाचते होऊया मराठी निबंध | Vachanache Mahatva Nibandh Marathi
वाचनामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. ज्ञान कधीही वाया जात नाही असे म्हणतात ते अगदी बरोबर आहे.
दिसामाजी काही तरी ते लिहावे ।
प्रसंगी अखंडित वाचित जावे ।।
समर्थ रामदास स्वामी यांच्या या ओळींमधून वाचनाचे महत्व आपल्याला समजते. आपल्यालाकडे ज्ञान मिळवण्यासाठी अनेक साधने आहेत. वाचन हे त्यातील एक महत्वाचे साधन आहे.
वाचन आपल्या जीवनामध्ये का गरजेचे आहे हे आपण शालेय जीवनापासून आपल्या शिक्षकांकडून ऐकत आलो आहे. आपला भरपूर वेळ कामात जातो. वाचन करण्यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते. वाचनामुळे आपले व्यक्तिमत्व घडते. आपला आत्मविश्वास वाढतो.
आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेन तर त्या क्षेत्रातील ज्ञान असेन आवश्यक असते त्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे. ज्ञान ही मनुष्याजवळ असलेली सर्वात मोठी शक्ती आहे. वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तक वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहिती मिळते. वाचनामुळे आपला वेळ स्तकर्मी लागतो.
आपल्याकडे वेळ असेन तर त्या वेळेत आपण वाचन केले तर आपला वेळ वाया न जाता आपल्याला अनेक सुंदर विचार वाचायला मिळतात.
👉निसर्ग आपला मित्र निबंध मराठी हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈
वाचन करण्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडत असते. आपण शालेय जीवनात असताना परीक्षेत उत्तीर्ण होतो ते उत्तम वाचनामुळेच.
वाचनाशी होईल मैत्री,
यशाची मिळेल खात्री.
पुस्तकांशी आपली मैत्री झाली तर आपल्याला वाचन करण्याची आवड निर्माण होते. वाचण्याचे अनेक फायदे देखील होतात. आपण वाचन करून आपला विकास करू शकतो. आपल्याला वाचन करण्याची सवय लागली तर आपल्याकडे ज्ञानसामग्री वाढते. मुलांना लहानपणापासून वाचनाची सवय असेन तर मुले पुढे हुशार बनतात.
वाचते होऊया मराठी निबंध | vachate houya marathi nibandh
वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते त्यामुळे आपला मेंदू कार्यश्रम होतो. वाचनामुळे आपण समजूतदार बनतो. वाचन करण्यामुळे आपल्या विचारांमध्ये परिवर्तन झालेले आपल्याला पाहायला मिळते. जास्त वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडत जाते.
आपल्याला आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी ज्ञान मिळवणे गरजेचे आहे. आपल्याला हे ज्ञान मिळते ते वाचनामधून. वाचन करण्यामुळे आपल्या बुद्धीला चालना मिळते. वाचनामुळे आपल्या मेंदूची कसरत व व्यायाम होतो.
वाचन करण्यामुळे आपण सुसंस्कृत बनतो. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला आपल्या पुढील जीवनात होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, “वाचाल तर वाचाल”. हा विचार आपल्यासाठी खूप मोलाचा आहे.
मुलांना वाचनामध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून 15 आक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा केला जातो वाचन करण्यामुळे आपल्याकडे असलेल्या शब्दसमग्रीमध्ये
भर पडते. वाचनामुळे आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नवनवीन गोष्टींची माहिती आपल्याला मिळत असते.
वृत्तपत्रातून जगभरात काय घडामोडी घडत आहेत याची माहिती आपल्याला मिळते. वाचनामुळे अनेक संधी आपल्यासाठी निर्माण होतात. बातम्या, नोकरीच्या संधी यांची माहिती मिळण्यास मदत होते. आपण जर ही माहिती वाचत असेन तर याच उपयोग आपल्याला नक्की होतो.
वाचन करण्याच्या सवयीमुळे आपल्याला ग्रंथांची, कवितांची, इतिहासाची माहिती आपल्याला मिळते. वाचनामुळे आपण आपला संयमी बनतो . लहानपणापासून आपल्याला वाचनाची आवड असेन तर आपल्याकडे भरपूर ज्ञान असेन त्याचा उपयोग आपण आपल्या शालेय जीवनात तसेच शालेय जीवनांनंतरही करू शकतो.
वाचनाच्या सवयीमुळे आपण इतरांशी संवाद साधू शकतो. आपल्याकडे ज्ञानाचा साठा असेन तर आपण एखाद्या चर्चेत आपले मुद्दे व्यवस्थितपणे मांडू शकतो. आपले विचार वाचनामुळे आपण इतरांना पटवून देऊ शकतो. भरपूर लोक आपल्याशी जोडले जातात.
वाचन करण्यामुळे आपल्या मनात असलेली भीती नाहीशी होऊन आपण उत्तम वक्ते होऊ शकतो. वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान आपल्याकडे असेन तर आपण निबंध, भाषण स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतो. यशस्वी लोकांनी आपल्या जीवनामध्ये कठोर मेहनत घेतली. भरपूर ज्ञान त्यांनी आत्मसात केले. त्यांनी आपल्याला आयुष्यामध्ये वाचनाला महत्व दिले व भरपूर ज्ञान मिळवले.
वाचनाचे महत्व मराठी निबंध | Vachanache Mahatva Nibandh Marathi
शाळांमध्ये मुलांना वाचनासाठी वाचनालयाची व्यवस्था केलेली आहे. वाचनालायमध्ये अनेक विषयांची पुस्तके असतात. मुलांनी वाचनालयामध्ये जाऊन ती पुस्तके वाचली पाहिजेत. वाचनामुळे आपण समोरच्याचे बोलणे शांतपणे ऐकून व समजून घेऊ शकतो. वाचनामुळे आपण संयमी बनतो.
आज इंटरनेटवर खूप माहिती उपलब्ध आहे. इंटरनेटवरूनही आपण खूप माहिती मिळवू शकतो. अलीकडे लोकांचा भरपूर वेळ हा कामात जातो परंतु या धावपळीतही आपण वाचनासाठी वेळ काढला पाहिजे. पालकांनी स्वतः वाचन केले तर मुलेही आपल्याकडून मार्गदर्शन घेऊन वाचनाला महत्व देतील.
पालकांनी मुलांना वाचनाचे महत्व पटवून दिले पाहिजे. एकमेकांना आपण पुस्तके भेट म्हणून देऊ शकतो. वाचनालयांची संख्या वाढवू शकतो. वाचनालायमध्ये मुलांना अभ्यासासाठी उपयुक्त अशी पुस्तके उपलब्ध करू शकतो. आपल्याला आपली वाचन संस्कृती अशीच व्यवस्थित ठेवायची असेन तर आपण स्वतः वाचन केले पाहिजे व इतरांना वाचनाचे महत्व सांगून वाचन करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
विद्यार्थ्यांनमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल तसेच वाचनाचा छंद लागेल असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. आपण वाचनाचा आनंद हा घेतला पाहिजे. चला तर मग आजपासून आपल्यापासून सुरवात करूया आणि आपली वाचन संस्कृती जपुया.
मित्रांनो तुम्ही या निबंधसाठी असेही शीर्षक देऊ शकता-
- वाचनाचे महत्व मराठी निबंध
- वाचते होऊया मराठी निबंध १२वी
- वाचाल तर वाचाल निबंध मराठी
तर मित्रांनो तुम्हाला “वाचते होऊया मराठी निबंध |Vachanache Mahatva Nibandh Marathi” हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ वाचनाचे महत्व या संबंधीत काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.